यावर्षीचा अर्थसंकल्पीय बजेट(Union Budget 2022) हे शेतकऱ्यांच्या(Farmers) दृष्टीने अत्यंत निराशाजनक आहे. अर्थमंत्र्यांनी कृषी सुधारणाच्या नावाखाली केवळ स्वप्नांचा मनोरा बांधला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये पाऊण टक्क्याने शेतीचे बजेट कापण्यात आले अशी निराशाजनक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी(Raju Shetty) यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राज्यभरातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शेतकरी नेत्यांनीही आजच्या बजेटवर नाराजी व्यक्त केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.