विधानसभेत यशोमती ठाकूर ,गोरे आणि  सुनिल प्रभू यांच्यात खडाजंगी 

विधानसभेत अंगणवाडी सेविकांना लावलेल्या मेस्मा कायद्यावरून गदारोळ झाला. यावेळी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या मुद्दयावरून शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार आमने -सामने आले होते . यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी विधानसभेत गोंधळ घातला.
Gore-Prabhu-Thakur
Gore-Prabhu-Thakur

मुंबई : विधानसभेत अंगणवाडी सेविकांना लावलेल्या मेस्मा कायद्यावरून गदारोळ झाला. यावेळी अर्थसंकल्पावरील  चर्चेच्या  मुद्दयावरून शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार  आमने सामने आले  होते . यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी विधानसभेत गोंधळ घातला. 'सकाळी आमच्यासोबत असलेल्या वाघांची शेळी कशी झाली ? ' असा टोला सुनिल प्रभू यांनी काँग्रेस आमदारांना उद्देशून  लगावला.

जलसंपदा विभागाच्या अर्थसंकल्पीय चर्चेवेळी शिवसेनेचे सदस्य गोंधळ घालत असल्याने काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर चिडल्या. शिवसेनेच्या आमदारांना उद्देशून यशोमती ठाकूर म्हणाले, " अगोदर सरकारमधून बाहेर पडा. अध्यक्ष महोदय आम्हाला बजेटवर काही सुचना मांडायच्या आहेत. पण सत्तेत असलेले तुमचे सहकारी गोंधळ घातलत आहेत. तुम्ही अगोदर सरकारमधून  बाहेर पडा अन मग बोला ."

यावर बोलताना सुनिल प्रभू म्हणाले, " अंगणवाडी सेविकांचे मानधन 4500 रुपयांहून 6500 हजार रुपये करण्याची घोषणा झाली तरी सरकारने अजून शासन निर्णय जारी केला नाही. अंगणवाडी सेविका असणाऱ्या विधवा, परित्यक्ता , गरीब महिलांवर मेस्मा का लावता? अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा रद्द करा ."

त्यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, " तुम्ही सरकारमधे बसून सरकारचा निषेध करताय. अगोदर सरकारमधून बाहेर पडा. सत्ताधारीच गोंधळ घालत आहेत. विरोधकांच्या मागण्यावेळी हे ठरवून चाललं आहे. आमचं म्हणण  ऐकून घ्यायचचं नाही असं ठरवलेलं आहे काय ? "

त्यावेळी प्रतिवाद करताना शिवसेने प्रतोद सुनिल प्रभू म्हणाले, " हे काँग्रेस- राष्ट्रवादीचे पाप आहे. यांनी अंगणवाडी सेविकांना पंधरावर्षात न्याय दिला नाही. त्यामुळे ही वेळ आलीय. सरकारमधून बाहेर पडायला आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. तुम्ही सकाळी आमच्या बरोबर होतात. आता काय झालं ? सकाळी आमच्यासोबत असलेल्या वाघांची शेळी कशी झाली ?"  
यावर पलटवार करत काँग्रेसचे आमदार विजय वड्डेटीवार म्हणाले, " चार वर्षे झोपले होते काय ? कँबिनेटमध्ये तुमचे मंत्री काय करतात ? चर्चा करा सांगतो आम्ही पंधरावर्षात काय केलं ते!"  
"   शेतकऱ्यांवर अन्याय होताना हे का शेळी झाले होते ? मंत्री मंडळात हा कायदा आणला जात असताना शिवसेनेचे मंत्री झोपले होते काय ? "असा सवाल  आमदार जयकुमार गोरे यांनी सुनिल प्रभू यांना विचारला.

यावेळी सभागृह दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी झालेल्या गोंधळातच जलसंपदा, पाणीपुरवठा, सहकार या विभागाचे मागण्यांना मंजूरी देण्यात आली. त्यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगीत करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com