मुंबई : प्रत्येक वर्षी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची एक बैठक घेणे आवश्यक असते. तसे सरकारचे संकेत आहेत. मात्र शेतकरी कर्जमाफी आणि इतर प्रश्नाच्या जंजाळात अडकलेल्या राज्य सरकारने औरंगाबाद येथे ही बैठक घेण्याचे टाळले. यामुळे या बैठकीचे काय झाले,असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय।मुंडे यांनी केला आहे.
यासाठी मुंडे यांनी एक पत्र लिहून मंत्रिमंडळ बैठकीचे काय झाले असा सवाल केला आहे. दरवर्षी औरंगाबाद येथे ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाते. परंतु या वर्षी ही ऑक्टोबर महिना जाऊन नोव्हेंबर अर्ध्यात आला तरी अद्याप या बैठकीचा कोणताही निर्णय झाला नाही, शिवाय 11 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीची कोणतीही सूचना अद्यापही औरंगाबाद येथील संबंधित अधिकारी आणि यंत्रणेला देण्यात आली नाही. हे समोर आल्याने या बैठकीचे नेमके काय झाले ? असेही मुंडे यांनी म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.