राज्यातील पोटनिवडणुकांत फडणवीसांचा कस लागणार !

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) राज्यात एक नंबरचे स्थान मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यात सुरु असलेल्या पोटनिवडणुकांत कस लागणार असल्याची चिन्हे आहेत.
Devendra-Fadanvis.
Devendra-Fadanvis.

मुंबई :  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) राज्यात एक नंबरचे स्थान मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यात सुरु असलेल्या पोटनिवडणुकांत कस लागणार असल्याची चिन्हे आहेत. 

एकाचवेळी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि पालघरसारख्या ठिकाणी शिवसेनेचे आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलावे लागत आहे . देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील यशाने उंचावलेला आहे . 

देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या राजकीय खेळपट्टीवर आता जम  बसला असून ते अतिशय वेगवान आक्रमक खेळ्या खेळताना दिसत आहेत . विरोधकांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवून ते आपले धोरण आणि दिशा ठरवताना दिसत आहेत . 

राज्यात मागील दोन-तीन वर्षांत दोन-तीन टप्प्यात झालेल्या महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायत निवडणुका मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. या निवडणुकांत भाजपला चांगले यश मिळाले.  त्यामुळे फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. 

मात्र, 2019च्या लोकसभा निवडणुकीला काही महिने अवधी उरला असताना सध्या राज्यात भंडारा-गोंदिया व पालघर या दोन लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तसेच, पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेल्या कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींतून निवडून  देण्याच्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी ही प्रचार सुरू आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून द्यावयाच्या प्रतिनिधीसाठीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाचा कस लागणार आहे. शिवसेनेने पालघरमध्ये उमेदवार उभा करून प्रचार सुरू आहे. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होऊन प्रचार सुरू आहे. शिवसेनेने एकला 'चलो रे'ची भुमिका घेत भाजपाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न सूर ठेवला आहे. त्यामुळे भाजपाला कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबर शिवसेनेचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यामुळे भाजपाची कसोटी लागणार आहे.

या निवडणुकीतील जयपराजयाला वेगळे महत्व आहे. ती आगामी निवडणुकीच्या वातावरणाची नांदी ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना यश खेचून आणावे लागणार आहे. त्यांची पत कायम ठेवायची असेल तर या निवडणुकांत मागील निवडणुकीप्रमाणे यश संपादन करावे लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस या निवडणुकात कोणता फंडा वापरतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com