गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्या : अजित पवार

पुणे महापालिकेत सत्तांतर झाले तेव्हा मी मूठभर बिल्डरांची सत्ता येणार का, असा सवाल केला होता. आता मित्रमंडळ भूखंड प्रकरण कानावर येत आहे. यावरून माझी शंका खरी होती, असेच दिसूून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
girish-mahajan-ajit-pawar
girish-mahajan-ajit-pawar

पुणे : "कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याच्याशी काडीचा संबंध नसताना ज्येष्ठ नेते शरद पवारांची बदनामी केली गेली. आता मात्र राज्य सरकारमधील जबाबदार मंत्री गिरीश महाजने हे दाऊदच्या नातेवाइकाच्या लग्नाला जातात. यावर चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र थातूरमातूर उत्तर दिली जात आहेत. गिरीश महाजन यांच्याकडून झालेल्या चुकीसाठी त्यांचा राजीनामा घेतला जावा. तसचे त्यांनी प्रायश्‍चित्त केले पाहिजे,''अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलताना ते म्हणाले, ""मोदींनी भ्रमनिरास केला आहे. तीन वर्षे झाली. "अच्छे दिन' आले नाहीत. काश्‍मीर मध्ये पाकिस्तान दहशतवादी कारवाया करत आहेत. तेव्हा 56 इंच छाती दिसत नाही. तूर, टोमॅटो, कांदा, आंबा कशाला भाव नाही. हमीभाव नाही. "


मुख्यमंत्री हेलिकॉप्टरच्या अपघातातून आज बचावले. याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना श्री. पवार म्हणाले, ""अतिमहत्त्वाच्या लोकांचे अतिशय व्यस्त दौरे असतात. अशा वेळी हेलीकॉप्टरची देखभाल ठेवली जाते का, हे पाहण महत्वाचे आहे. दुर्दैवाने अपघात घडला असला तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या सुदैवाने मुख्यमंत्र्यांना काही इजा झालेली नाही. मी परमेश्वराचे आभार मानतो. कोणाच्याही बाबतीत असा अपघाताचा प्रसंग उद्भवू नये अशीच अपेक्षा आहे.'' 


"लवासा'या प्रकल्पाचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा राज्य सरकारने घेतल्याबद्दल त्यांनी याबाबत सरकारला स्वातंत्र असल्याचे सांगितले. तसेच या निर्णयाचा सर्वसामान्य जनतेवर परिणाम होणार नसल्याचे नमूद केले. 


उसाच्या एफआरपीमध्ये 250 रूपयांची वाढ केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अगदीच काही नसण्यापेक्षा हे बर असल्याचे ते म्हणाले. 


    'पुणे महापालिकेत सत्तांतर झाले तेव्हा मी मूठभर बिल्डरांची सत्ता येणार का, असा सवाल केला होता. आता मित्रमंडळ भूखंड प्रकरण कानावर येत आहे. यावरून माझी शंका खरी होती, असेच दिसूून येत असल्याचे त्यांनी सांगितले. 


''नोटबंदीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत 584 कोटी रुपये पडून आहेत. पूर्ण राज्यातील जिल्हा बॅंकांमध्ये करोडो रुपये अडकले आहेत.आम्ही मोदी, जेटलीना भेटलो. चार वेळा तपासण्या झाल्या. सात महिने झाले.''

''तपासणीत दोषी असणाऱ्यांवर कारवाई करा. दोषी नसतील त्यांचे पैसे मोकळे करा. तसे आदेश केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थविभागाच्या सचिवांना द्यावेत.''

'' शरद पवार उद्या दिल्लीत सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चेला जात आहेत. तेव्हा जिल्हा बॅंकांची आर्थिक कोंडी या विषयावरही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत'', असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com