नागपूर : देशातील शेतकऱ्यांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 17 रुपयांचा चेक पाठविणार आहे. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात केलेली मानधनाची योजना फसवी असल्याचा आरोप शेतकरी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महिन्याला 500 रुपये देण्याची योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकरी कुटुंबाला प्रती दिन केवळ 17 रुपये मिळणार आहे. एका कुटुंबात 5 जण राहतात, असे गृहित धरले तर प्रती व्यक्ती केवळ साडेतीन रुपये मिळणार आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.
भाजप सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे जाहीरनाम्यात घोषित केले होते. या घोषणांची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना केवळ 500 रुपये महिना देण्याचा निर्णयाने शेतकऱ्यांना कोणताही लाभ होणार नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
या योजनेचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसतर्फे पंतप्रधानांना 17 रुपयांचा चेक पाठविणार आहे. ही मोहिम देशव्यापी राबविली जाणार आहे. देशातील शेतकऱ्यांतर्फे हे चेक पाठविले जाणार असल्याचे पटोले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.