पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांनी मांडला दुःखाचा बाजार; सचिन सावंतांचा टोला 

पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांनी मांडला दुःखाचा बाजार; सचिन सावंतांचा टोला 

पालघर : लोकसभा पोट निवडणूकीच्या प्रचारासाठी जिल्ह्याचा दौरा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा गेल्या चार वर्षांत कोणता विकास साधला हे मांडण्यासाऐवजी दुःखाचा बाजार मांडला अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी येथे केली. 

फडणवीस हे मल्ल्या, निरव मोदी यांचे राजकीय अवतार व प्रतिरूप असून निवडणूक काळात भरभरून आश्‍वासन द्यायची व मत मिळाल्यानंतर पोबारा करण्याची त्यांची पद्धत असल्याचे सांगितले. या तंत्राचा त्यांनी कल्याण-डोंबिवली, भिवंडी, पेण येथे अशा तंत्राचा वापर केला असून तेथील मतदारांसाठी मुख्यमंत्री वॉन्टेड असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांचे विकासाच्या मॉडेलची पालघर जिल्ह्यात अंमलबजावणी होत आहे का ? येथील शिक्षण, आरोग्य पायाभूत सुविधा आदी समस्यांवर बोलण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे तोड नसल्याने त्यांनी आपल्या भाषणात दुःखाचा बाजार मांडल्याची सांवत यांनी टीका केली. 

पालघरच्या जमिनी विकून कर्ज फेडणार ? 
पालघर मुख्यालय उभारणीसाठी राज्य सरकारकडे पैसे नसल्याने मोठ्या प्रमाणात जमिनीचे हस्तातर केल्याप्रकरणी सकाळमध्ये प्रसिद्ध वृत्ताची दखल घेऊन पालघरच्या जमिनी विकून राज्य शासन आपले कर्ज फेडणार का ? असा सवाल उपस्थित केला. पालघर पट्टयातील जमिनीचे अधिग्रहन सिडकोने केल्यानंतर ही जमीन इतरांना विकली जाईल व या व्यवहारातून मिळणारा पैसा पालघरच्या विकासासाठी वापरण्याऐवजी बाहेर दिला जाईल अशी शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com