सरकार शेतकरी आणि साखर कारखानदारांची  कुस्ती लावून मजा बघतय : राजू शेट्टी  

ज्या कारखान्यांनी एफ आर पी दिलेली नाही त्या कारखान्यांना गाळपाचे परवाने देऊ नका असं न्यायालयानं सांगितलं असतानाही त्यांना गाळप परवाने दिले आहेत.
Raju-Shetty-00
Raju-Shetty-00

पुणे :  "सरकार शेतकरी आणि साखर कारखानदार यांची कुस्ती लावून मजा बघत बसलंय,या सरकारला शेतकऱ्यांसाठी काहीही करायचं नाही, "अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. 

"ज्या कारखान्यांनी एफ आर पी दिलेली नाही त्या कारखान्यांना गाळपाचे परवाने देऊ नका असं न्यायालयानं सांगितलं असतानाही त्यांना गाळप परवाने दिले आहेत.  त्या कारखान्याचा ऊस पोलीस संरक्षणात कारखान्याकडे निघालाय. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर साखर कारखानदारांचे बगलबच्चे हल्ले करत आहेत,त्यावेळी पोलीस शेतकऱ्यांची बाजू घेत नाहीत उलट शेतकऱ्यांना धमकावत आहेत. शेतकरी आणि कारखानदार यांच्या कुस्त्या लावून सरकार प्रेक्षकाची  भूमिका बजावत आहे."असं शेट्टी म्हणाले. 

"शेतकऱ्यांना दर मिळावा म्हणून मुख्यमंत्री तिजोरी रिकामी करू असं म्हणाले होते मग आता काय झालं ? करा ना तिजोरी रिकामी, "असं आवाहन शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं. सरकारने कुस्त्या लावण्यपेक्षा तोडगा काढावा असं शेट्टी म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com