मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आंबेडकरी पक्षांचा झालेला दारूण पराभव लक्षात घेउन रिपाइंचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आंबेडकरी पक्ष संघटनाच्या ऐक्याची भाषा करत आहेत.
ऐक्यासाठी आपण पुढाकार घेत असल्याचे ते वेळोवेळी जाहीर करीत असले तरी अशा प्रकारे ऐक्य होत नाही. ऐक्य करण्यासाठी त्यांनी अगोदर भाजपाशी असलेले नाते तोडावे, त्यासोबतच आपल्या मंत्रीपद सोडून द्यावे आणि मगच ऐक्यासाठी पुढे यावे, त्यानंतरच ऐक्यासाठीची चर्चा होईल, अशी भूमिका भारिप बहुजन महासंघाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून आंबेडकरी पक्ष, संघटनाच्या ऐक्यासंदर्भात आठवले यांनी पुढाकार घेत अनेक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठासह राज्यातील अनेक शहरांमध्ये यासंदर्भात बैठकाही सुरू केल्या आहेत.
नुकतेच आठवले यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ऐक्य झाल्यास त्याचे अध्यक्षपद आपण भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारावे असे आवाहन केले होते.
या अहवानानंतर राज्यातील रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये ऐक्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असले तरी भरिप बहुजन महासंघाकडून मात्र ऐक्यासाठी आठवले यांनी अगोदर भाजपाशी आपली अगोदर नाळ तोडावी आणि चर्चेसाठी पुढे यावे अशी अट टाकली आहे.
आठवले केवळ कार्यक्रमांच्या ठिकाणी ऐक्याच्या संदर्भात वक्तव्य करत आहेत, मात्र अशा प्रकारे केवळ वक्तव्य करून मार्ग सापडणार नाही, त्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी त्यांनी आले पाहीजे. मात्र येत असताना ज्या पक्षामुळे राज्यात आंबेडकरी समाजाची आणि मतदारांची विभागणी झाली त्या पक्षाशी नाळ तोडणे आवश्यक आहे, अन्यथा चर्चा पुढे जाणारच नसल्याचे भारिप बहुजन महासंघाचे कार्यालयीन सचिव व ज्येष्ठ साहित्यिक ज.वि. पवार यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.