मुंबई ः राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेत बसविले. विश्वास टाकला. त्या शेतकऱ्यांचा तुम्ही विश्वासघात केला आहे. त्यांच्या कर्जमाफीसाठी संपूर्ण राज्यातील जनता सरकारच्या निर्णयाची वाट पाहत असतानाच तुम्हाला जीएसटीसाठी अधिवेशन घ्यायला जमते मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अधिवेशन का घेता येत नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज महाड येथे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात आलेल्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील संघर्ष यात्रेला आज रायगड येथून मोठ्या जल्लोषात सुरूवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बडया नेत्यांनी सरकारविरोधात काढण्यात आलेली ही यात्रा अधिक प्रभावी करण्याचे सुतोवाच केले. या यात्रेत दोन्ही पक्षाचे 40 हून अधिक आमदार सहभागी झाले होते. रायगडनंतर महाड येथे पोहोचलेल्या यात्रेचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.