खैरैंविरोधात भाजपकडून लढणार : शांतीगिरी महाराजांची घोषणा

शांतिगिरी महाराज यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णयाने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. परंतु भाजप उमेदवारीची माळ महाराजांच्या गळ्यात टाकणार की अन्य कुणाच्या हे गुपीत अद्याप उघड झालेले नाही. भाजपचे नेत्यांनी बाबांना उमेदवारीबाबत शब्द दिला का, पक्षाच्या अन्य उमेदवारासाठी आशीर्वाद मागितले या संदर्भात बांबानी "मौन' बाळगले.
 खैरैंविरोधात भाजपकडून लढणार : शांतीगिरी महाराजांची घोषणा

औरंगाबाद : केंद्रात मोदी, युपीत योगी आणि औरंगाबाद लोकसभेत त्यागी असे म्हणत वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महामंडलेश्‍वर शांतगिरी महाराज यांनी आगामी लोकसभा लढवण्याचा निर्धार सरकानामाशी बोलतांना व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चारवेळा विजय मिळवलेले शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधातील उमेदवार कोण असेल? या प्रश्‍नाचे उत्तर अखेर सापडले आहे. वेरूळ येथील आश्रमातूनच शांतिगिरी महाराज यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. आपले प्राधान्य भाजपला असणार आहे. उमेदवारी संदर्भात भाजपच्या नेत्यांकडून आपल्याला विचारणा केली जात असली तरी अद्याप थेट चर्चा झाली नसल्याचे शांतिगरी महाराज म्हणाले. 

भाजपने उमेदवारी दिली तर ठीक, नाही तर भक्तांच्या ताकदीवर पुन्हा अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात आपण उतरणार असल्याचे शांतिगरी महाराज यांनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापुर्वी शांतीगिरी महाराज यांनी 2009 मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र या निवडणूकीत शांतिगिरी महाराजांनी लाखावर मते मिळवत आपली ताकद दाखवून दिली होती. 

भक्त परिवाराकडून निवडणूक लढवण्याची प्रेरणा 
वेरुळ येथे गेल्या महिन्यात संत जनार्दन स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या सोहळ्यात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या काही दिग्गज नेत्यांनी बाबांच्या आश्रमात हजेरी लावली होती. तेव्हापासूनच शांतिगिरी महाराज भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरु झाली होती. 

शांतिगिरी महाराज यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णयाने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. परंतु भाजप उमेदवारीची माळ महाराजांच्या गळ्यात टाकणार की अन्य कुणाच्या हे गुपीत अद्याप उघड झालेले नाही. भाजपचे नेत्यांनी बाबांना उमेदवारीबाबत शब्द दिला का, पक्षाच्या अन्य उमेदवारासाठी आशीर्वाद मागितले या संदर्भात बांबानी "मौन' बाळगले. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात गेल्या 25 वर्षांपासून काहीच बदल झालेला नाही. हा बदल कधी पहायचा हे जनता जर्नादनानेच ठरवावे. जय बाबाजी भक्त परिवाराचा रेटा असल्याने आगामी 2019 ची लोकसभा निवडणूक लढण्याची आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचे शांतिगिरी महाराज म्हणाले. इतर पक्षाच्या व प्रतिस्पर्धी उमेदवारां विषयी विचारले असता त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. आपण मात्र निवडणूक लढवणारच असा ठाम निश्‍चय देखील त्यांनी बोलून दाखवला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com