पुणे : छत्रपती उदयनराजे माझ्या मुलासारखे आहेत, असे सांगत त्यांनी आता कुठं तरी पाय रोवून उभे राहावे. कोणता तरी एक पक्ष धरून राहावे, असा वडिलकीचा सल्ला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांना दिला. सामान्य माणसाच्या जीवनात डोकावून बघा आणि पुन्हा उभे राहायचा प्रयत्न कराही, असे त्यांनी सुचविले.
`सरकारनामा`ला दिलेल्या मुलाखतीत सातारा लोकसभा निवडणुकीविषयी भाष्य केले. आम्हाला साताऱ्याच्या गादीचा आदर यापुढेही कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. पण त्यासाठी संबंधितांनी गादीचा आदर राहील, हे पाहावे, असाही सल्ला त्यांनी दिला.
ते म्हणाले, ``साताऱ्यातील पावसाच्या सभेचा परिणाम राज्यभर झाला. राजेंनी राष्ट्रवादी काॅंग्रेस सोडून निवडणूक लादल्याने साताऱ्याच्या लोकांमध्ये अस्वस्थता होती. ती मतपेटीतून समोर आली. हा सर्वस्वी निर्णय सातारकरांचा होता. सातारचे लोकं राजकीय दृष्ट्या समंजस आणि योग्य असल्यावर जीव देणारे आणि पटणारे नसेल तर सातारी बाणा दाखवणारे दाखवणारे आहेत.
या वेळी साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की पवार साहेबांनी मला २६ सप्टेंबराला सकाळी सांगितलं उमेदवारीविषयी सांगितल होतं. लढायला कोणीच तयार नाहीय तुम्ही कागदपत्रे गोळा करून अर्ज भरण्याची तयारी करा. ही बातमी सगळीकडे आल्यावर माझ्याकडे लोक गोळा झाले. साहेबांनी तुम्हाला निवडलं आहे, आम्हाला उट्टे काढायचे आहे, असे लोकांनी मला आवर्जून सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.