मुंबई : हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ज्यांची ओळख राज्यात आहे, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती सरकार साजरी करते. मात्र त्या जयंतीच्या दिवशी वसंतराव नाईक यांच्या नातेवाईकांपलीकडे त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी कोणी येत नाही. कोणते राजकीय पक्षाचे नेते आणि शासनाकडूनचा प्रतिनिधीही हजर नसतो, ही गंभीर बाब असल्याची खंत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केली.
वसंतराव नाईक यांचे राज्याच्या उभारणीत आणि विशेषतः कृषि क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोठे योगदान दिले. अशा महापुरुषांची जयंती साजरी करताना शासनाकडून त्यांचा प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित राहिले पाहिजेत यासाठी सरकारने नोंद घ्यावी असे निर्देशही सभापतींनी यावेळी दिले.
राज्य सरकारकडून 1 जुलै रोजी मतदार दिन साजरा केला जाणार असल्याने त्याविरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. याच दिवशी साजरा केला जाणारा वसंतराव नाईक यांच्या नावाने कृषि दिन डावलून हा मतदार दिन घेत असल्याचा आरोप विरोधी सदस्यांकडून करण्यात आला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.