विजय जाधवांकडे अस्थिकलश  होता शस्त्र नव्हते तरी अटक का ? 

विजय जाधवांकडे अस्थिकलश  होता शस्त्र नव्हते तरी अटक का ? 

मुंबई  : शेतकरी प्रश्‍नी मंत्रालयासमोर अस्थिकलशासह उपोषणास बसलेल्या विजय जाधव या शेतकऱ्याला पोलिसांनी मध्यरात्री का अटक केली ? त्यांच्याजवळ कोणतेही शस्त्र नव्हते. होते ते अस्थिकलश तेही पोलिसांनी का ताब्यात घेतले असा सवाल शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. 

शेतकरी प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी जाधव यांना मुख्यमंत्र्यांची एकदा भेट हवी आहे. ही भेट मिळत नाही. लोकशाहीमार्गाने उपोषण करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अस्थिकलश घेऊन उपोषण सुरू केले. त्यांच्या हातात कोठे शस्त्र होते? तरीही पोलिसांनी त्यांना का ताब्यात घेतले. याची चौकशी करावी अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. 

कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मुली हुंडा देता येत नाही. लग्न होत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे. याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करून सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. तसेच तूरडाळ खरेदीलाही मुदत वाढ शासनाने दिली पाहिजे असेही त्या म्हणाल्या. 

दरम्यान, निलम गोऱ्हे यांच्या मागण्याबाबत सरकार योग्य ती दखल घेईल याविषयी निवेदन केले जाईल असे आश्‍वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com