Uddhav Thackeray, devendra fadnavis
Uddhav Thackeray, devendra fadnavis  sarkarnama
ठाणे

OBC reservation : ठाकरे सरकारचा बुरखा फाडा ; फडणवीस संतापले

सरकारनामा ब्युरो

ठाणे : ''महाविकास आघाडी सरकारच्या (Thackeray government) उदासीनतेमुळे ओबीसी आरक्षण (obc reservation) गेले, यांची इको सिस्टीम एका सुरात खोटे बोलते. ओबीसी आरक्षण संपूर्ण देशात गेले नाही तर केवळ आणि केवळ महाराष्ट्रात गेले आहे. ओबीसीं समाजामध्ये जाऊन या सरकारचे सत्य मांडायला हवं ,कशा प्रकारे आरक्षण गेलं, कशा प्रकारे अन्याय केला जातोय यासर्व गोष्टी समाजात सांगाव्या लागतील. या सरकारचा बुरखा टरा टरा फाटला पाहिजे,'' अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला.

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चातर्फे ठाणे येथे आयोजित ओबीसी जागर अभियान, कोकण आणि ठाणे विभागीय मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते.केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी मंत्री राम शिंदे, डॉ. संजय कुटे, किसन कथोरे, निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, गणपतशेठ गायकवाड, कुमार आयलानी, नरेंद्र पवार, संजय केळकर, योगेश टिळेकर उपस्थित होते.

''ओबीसी आरक्षण केवळ गेले नाही तर ओबीसी समाजावर आज मोठा अन्याय होतो आहे. याचसाठी हे ओबीसी जागर अभियान आहे. एम्पिरिकल डेटा आणि जनगणनेचा डेटा यात सुद्धा कायम बुद्धिभेद केला जातो. केंद्राकडे आहे तो जनगणनेचा डेटा आणि त्याचा आरक्षणाशी संबंध नाही. आरक्षण देण्यासाठी एम्पिरिकल डेटा हवा आहे, आणि तो राज्य सरकारच मागासवर्ग आयोगाकडून मिळवू शकतो,'' असे फडणवीस यांनी सांगितलं.

''बारा बलुतेदारांना या सरकारने एक रुपयाही दिला नाही. हे बोलघेवड्यांचे सरकार आहे. ओबीसींना न्याय मिळत नाही, तोवर भाजपा गप्प बसणार नाही. ओबीसी समाजाचे खरे मारेकरी ठाकरे सरकार (Thackeray government) आहे. आम्ही सगळ्यांनी त्यावेळी ओबीसी आरक्षण टिकवले. या सरकारला 15 डिसेंबर 2019 रोजी सांगितले की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा. राज्य मागास आयोग गठीत करा अशा तीन टेस्ट करा तुमच्या आरक्षण कोणीही हात लावणार नाही. मात्र, सरकारनं काही केलं नाही. या सरकारला जनगणना नको राज्य मागास आयोग नकोय,'' अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

भाजपतर्फे ओबीसी मोर्चा जागर अभियानाचा शुभारंभ पंढरपुरातून गेल्या नऊ तारखेला करण्यात आला. यावेळी भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आणि ओबीसी समाजाचा विश्वास घात केल्याचा आरोप केला. तसेच 'बा विठ्ठला ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची आघाडी सरकारला सुबुद्धी दे,' असं साकडंही टिळेकर यांनी विठ्ठलाला घातले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT