Chitra_Wagh
Chitra_Wagh 
ठाणे

मोदी सरकारची डाळ शिजू देऊ नका:  चित्रा वाघ 

श्रीकांत खाडे

अंबरनाथ : " दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, बेरोजगारी, रेशनवरील अन्नधान्याचा खडखडाट, तुरडाळीची बेसुमार भाववाढ आदी समस्या नागरिकांवर लादलेल्या मोदी सरकारची डाळ आगामी निवडणुकीत शिजू देऊ नका", असे आवाहन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे केले.

अंबरनाथ राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे महिला पदाधिकारी मेळाव्यात प्रदेशाध्यक्षा वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

"निवडणुकीआधी अच्छे दिनचे गाजर दाखवणाऱ्या मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या काळात महिलांनी घरखर्चासाठी उपयोगी येतील म्हणून मीठ आणि पिठात लपवू ठेवलेले पैसे द्यावे लागले."

" उज्ज्वला गॅसच्या नावाने बराच गाजावाजा केला; मात्र ग्रामीण भागात महिलांना गॅस आणण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, रेशनवरील केरोसीन बंद केल्याने चूल पेटवायची कशी, या चिंतेत महिलावर्ग आहे. हे लक्षात घेत, खोट्या प्रलोभनांना बळी पडू नका," असा सल्लाही प्रदेशाध्यक्षा वाघ यांनी दिला.

येथील रोटरी सभागृहात झालेल्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, महिलाध्यक्षा विद्या वेखंडे, शहराध्यक्षा पूनम शेलार, शहराध्यक्ष सदाशिव पाटील, नगरसेवक सचिन पाटील, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आदींची या वेळी भाषणे झाली.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT