ठाणे

रायगडचे पालकमंत्री महेतांवर निष्क्रियतेची टीका; भाजप प्रवक्‍त्यांचे मौन 

सरकारनामा ब्युरो

खोपोली : राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने तीन वर्षांत सरकारने योजनांची अंमलबजावणी परिणामकारकपणे केल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नुकताच येथे केला; पण रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्यावर निष्क्रियतेची टीका होत असल्याबद्दल वाघ यांनी मौन बाळगले. 

रायगड जिल्ह्यात बंद होत असलेले उद्योग, नादुरुस्त रस्ते व इतर समस्यांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवरही वाघ यांनी मौन ठेवणे पसंत केले. या वेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूरही उपस्थित होते. 

भाजप सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्त वाघ यांची संपर्क मोहीम सुरू आहे. खोपोलीमध्ये बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्याचे सांगितले. मागील काळातील बंद असलेल्या अनेक महत्त्वाच्या योजना नव्याने आवश्‍यक त्या सुधारणा करून पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच शेतकरीवर्गाला चांगले दिवस येतील, असा दावा वाघ त्यांनी केला. 

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जाची रक्कम थेट त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करून त्याची परतफेड शेतकऱ्याच्या खात्यावरून ऑनलाईन पद्धतीने केली. त्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने कर्जमुक्त होऊन नव्याने कर्ज घेण्यास पात्र झाला आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यात हे सरकार यशस्वी झाले आहे, असे ते म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT