ठाणे

वाहतूक कोंडीत अडकल्याने राज ठाकरेंनी भिवंडीत भाजपचे काढले वाभाडे

सरकारनामा

भिवंडी  : भिवंडी शहर व ग्रामीण भागात सर्वत्र खड्डे पडले असून वाहतूककोंडीमुळे भिवंडीकरांची दैना उडाली आहे. याचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आला. या वेळी खड्ड्यात गाडी अडकल्याने राज ठाकरे यांनी संताप व्यक्‍त करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

राज्यातील रस्ते खराब झाले आहेत; मात्र तरीही सरकार लक्ष देत नसून, टोल नाके सुरू आहेत. सर्व ठिकाणी अनागोंदी कारभार सुरू असल्याची टीका त्यांनी या वेळी केली. भिवंडीत आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

पावसाने हजेरी लावल्याने ही सभा होणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता; मात्र मात्र पावसाने थोडी उसंत घेतल्याने राज ठाकरे यांची सभा पार पडली.

सायंकाळी 5 वाजता असलेल्या सभेसाठी पोहचण्यासाठी निघालेल्या राज ठाकरेंना भिवंडीतील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांचा मोठा सामना करावा लागला. भिवंडी बायपास येथे वाहतूक कोंडीत राज ठाकरे अर्धा तास अडकून पडल्याने त्यांनी संताप व्यक्‍त केला.

सध्या सगळे राजकीय पक्ष सत्तेसाठी धावत आहेत; मात्र सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष सक्षम नसल्यास सत्ताधारी काहीही निर्णय घेण्याची शक्‍यता असते, त्यामुळे माझ्या हातात विरोधी पक्षाची सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT