varsha gaykawad
varsha gaykawad 
ठाणे

आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आता जूनमध्येच शाळेत जायचे...

उमेश घोंगडे

पुणे : कोरोनोच्या पार्श्‍वभूमीवर पहिली ते आठवीच्या राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व शाळांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. नववी व अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्यात येणार असून त्याबाबतचे वेळापत्रक कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर शाळा आपआपल्या पातळीवर ठरवतील, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालये गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहेत. मात्र, पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षांचा निर्णय अद्याप झालेला नव्हता. परिणामी परीक्षा होणार की नाही याबद्दल शाळाचालक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. गायकवाड यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे हा संभ्रम दूर झाला आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी नववी व अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी जाहीर केले. राज्य मंडळाचे दहावी व बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वच शाळांची जाहीर केल्या होत्या. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यार्पंत या सर्व परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शाळांना सुट्या द्याव्या लागल्या होत्या.

शिक्षणमंत्री गायकवाड यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकप्रकारे आता उन्हाळी सुटी लागली आहे. या विद्यार्थ्यांच्या शाळा आता थेट जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT