udhhav_phadnis
udhhav_phadnis 
ठाणे

युतीच्या संकेतामुळे इच्छुकांच्या जीवाला घोर

राजेश मोरे

ठाणे :  शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून युतीचे संकेत दिले जात आहे. अशातच वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीसाठी पोषक वातावरणही तयार होत आहे; पण त्याच वेळी गेल्या वर्षभरापासून युती होणार नाही, या गृहीतकावर आपल्या मतदारसंघात मतांची बेगमी करणाऱ्या युतीमधील इच्छुकांच्या जीवाला आता घोर लागला आहे. सध्या तरी या इच्छुकांनी आपल्या इच्छा जाहीरपणे व्यक्त करण्यास टाळल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने भाजपवर टीका केली जात होती. त्यांच्याकडून वारंवार पंतप्रधानावर टीका होत असल्याने शिवसेना आणि भाजपमधील दरी वाढली होती. त्यातही उद्धव यांनी वारंवार जाहीरपणे आणि पक्षाच्या अंतर्गत बैठकीत 'एकला चलो रे'चा आवाज दिला होता. त्याचवेळी भाजपकडूनही राज्यभरात चाचपणी करून एकट्याने पुन्हा लढण्याची वेळ आल्यास संभाव्य उमेदवार कोण? हे पाहिले जात होते. 

त्यामुळेच या दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी युती होणार नाही, हे गृहीत धरून आपल्या मतदारसंघात काम करण्यास सुरुवात केली होती; पण गेल्या महिन्यभरापासून उद्धव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्यानंतर आता युती होणार, असे मानले जात आहे. त्यामुळेच या इच्छुकांनी आता पुढील दोन महिने आस्ते कदम जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही शिवसेनेच्या इच्छुकांना अद्यापही शिवसेना 'एकला चलो रे'च्या भूमिकेत कायम राहिली, असा विश्वास असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT