IAS केंद्रेकर : शेतकऱ्यांसाठी काम करताना जीव तर जाणार नाही ना? 
IAS केंद्रेकर : शेतकऱ्यांसाठी काम करताना जीव तर जाणार नाही ना?  
अधिकारी

IAS केंद्रेकर : शेतकऱ्यांसाठी काम करताना जीव तर जाणार नाही ना? 

सरकारनामा ब्युरो

पुणे: शेतकऱ्यांना ठिकठिकाणी लुटले जातेय. त्यामुळे त्यांना मदत करण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यांच्यासाठी काम करताना जीव तर जाणार नाही ना? सैनिकाएवढे अवघड काम आहे कां?, असे प्रश्‍न करत राज्याचे कृषी आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी यंत्रणेचे कान टोचले. 

केंद्रेंकर यांनी नुकतीच कोल्हापूर विभागातील कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. दुष्काळी माण तालुक्‍यापासून त्यांनी आढाव्याला सुरवात केली. माती परीक्षण केलेय कां, असा प्रश्‍न विचारल्यावर काहींनी पुर्ण झाले नसल्याचे सांगितले. त्यावर केंद्रेकर म्हणाले, नेहमीची कामे पुर्ण झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना मदत आपण केलीच पाहिजे. हे काम केले म्हणून जीव जाणार नाही? कृषी विभाग बंद पडला तर शेतकऱ्यांच्या जीवनात काही पडणार नाही. कृषी विभागाच्या पोटावर मात्र पाय येईल, हे लक्षात ठेवा. शेतकऱ्यांसाठी वेगळे काही करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार करु नका. भ्रष्टाचाऱ्यांना मी पाठिशी घालणार नाही. शेतकरी कोणत्या परिस्थितीत काबाडकष्ट करत असतो, याची नेहमी जाणीव ठेवा, असेही केंद्रेकर म्हणाले. 

सातारा तालुक्‍यातील भ्रष्टाचाराच्या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT