bhavna_gavali_
bhavna_gavali_ 
अकोला

भावना गवळींचा विमा कंपन्यांना इशारा : शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज मागू नका अन्यथा ... 

सरकारनामा

वाशिम : पीकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज मागू नका अन्यथा शिवसेना  आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेच्या खासदार भावना गवळीयांनी दिला आहे .    वाशिम जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी  खासदार भावना गवळी आल्या  होत्या . 

खासदार गवळी म्हणाल्या , वाशिम जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्याचं परतीच्या पावसानं मोठं नुकसान झालं आहे. मात्र पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा विमाकंपनी कडून अर्ज मागविण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.  त्यामुळं विमाकंपनीने यापुढे शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना गप्प बसणार नाही . शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू.  शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्राकडे विशेष पॅकेजची मागणी आम्ही करत आहोत  ,असेही  यावेळी बोलताना त्यांनी सांगितल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT