अकोला

कसे बोलावे हेही `त्यांना' माहीत नाही; प्रकाश आंबेडकरांचा कुणाला टोला ?

सरकारनामा ब्युरो

अकोला : "कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी आम्हाला कोणीही बंदी घातली नाही. आम्ही तेथे सभा घेत नसतो. मात्र, ज्यांचा काही संबंध नाही ते बोलायला लागले आहेत. कसे बोलावे हेही त्यांना माहीत नाही,' असा टोला भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना लगावला. 

शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरेगाव भीमा येथे सभा होऊ देणार नाही, असे वक्तव्य समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले होते. कांबळे यांच्या वक्तव्याचा आंबेडकरांनी चांगलाच समाचार घेतला. 

कोरेगाव भीमाला भारतीय बौद्ध महासभा आणि भारिप बहुजन महासंघाची संयुक्त अभिवादन सभा होणार असून अभिवादन करण्यासाठी मी तेथे जाणारच आहे, असेही डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले. 

मराठा आरक्षणासंदर्भात बोलतांना आंबेडकर म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजबांधवांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले, की ओबीसींना दिलेले ताट (आरक्षण) वेगळे असल्याने मराठा समाजाला दुसरे ताट द्या. मात्र, भाजप आणि आरएसएसने ओबीसींच्या ताटातच मराठा समाजाला बसविले असून दोन्ही समाजात मतभेद निर्माण केले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT