छत्रपती संभाजीनगर

भाजप दहा हजार किटच्या माध्यमातून 50 हजार गरजूंची भूक भागवणार :दानवे

तुषार पाटील

भोकरदन: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र  लॉकडाऊन असताना मजुर गोरगरिबांचे  अन्नधान्यशिवाय मोठ्याप्रमाणावर हाल होत आहेत. ठीक ठिकाणाहून त्यांना  मदत पुरवली जात आहे. भाजपच्या वतीने जालना जिल्ह्यात दहा हजाराहून अधिक अन्नधान्य व जीवनावश्यक दैनंदिन वस्तूचे किट पुरवण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे भाजपच्या बूथ नेटवर्कच्या माध्यमातून गावपातळीपर्यंत प्रत्येक खेड्यापाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे किट घरपोच दिले जाणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले .

या किटमध्ये साधारण पाच लोकांना महिनाभर पुरेल एवढे रेशन असणार आहे.या माध्यमातून 50 हजार लोकांना मदत केली जाणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. गहू 5 किलो, साखर 1 किलो, तुरडाळ 1 किलो, तेल 2 बॅग, चहा पावडर,  250 ग्राम, मीठ, साबण आदी वस्तूंचा किटमध्ये समावेश असणार आहे.

सध्या जालना येथे पॅकिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिवाय जिल्हाभरात वाटप कशा पद्धतीने करायचे याचे नियोजन सुरू असून येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष वाटप केले जाईल असेही संतोष दानवे यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT