छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांच्या माल खरेदीत कुठलीही अडचण नाही; असल्यास संपर्क साधा : अर्जुन खोतकर

जगदीश पानसरे

 औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे .मात्र यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्यामुळे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. शेतकरी भाजीपाला घेऊन मार्केट कमिटीमध्ये येत असून तो व्यापाऱ्यांकडून खरेदीही केला जातोय. 

त्यामुळे शेतकऱ्याचा माल पडून आहे आणि त्याचे नुकसान झाले असे चित्र कुठेही नाही .जर काही भागात अडचणी असतील तर शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही तो माल खरेदी करण्याची तात्काळ व्यवस्था करू असा विश्वास शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

अर्जुन खोतकर म्हणाले,  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर धनधान्य, भाजीपाला, दूध फळे आणि दैनंदिन वस्तू यात कुठलीही अडचण येऊ नये याची खबरदारी राज्य सरकारने घेतली आहे.

थोडा फरक फळांच्या बाबतीत दिसून येतो, नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे जालना जिल्ह्यात व इतर भागात अंगुराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबाग शेतकऱ्याकडे शिल्लक असलेला अंगूर बाहेरच्या राज्यात कसा पाठवायचा याचा आम्ही विचार करतो आहोत .

एकरी एक ते सव्वा लाख एवढा खर्च करून अंगुराचे पीक घेतलेले आहे .परंतु त्याला बाजारात उठाव नसल्यामुळे थोड्याफार प्रमाणात याला फटका बसला आहे . लॉकडाऊन असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या अंगूराचे ट्रक आपण जिल्ह्याच्या बाहेर काढून देऊ शकतो. 

परंतु जर एखाद्या शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्याला त्याचा अंगूर बाहेरच्या राज्यात विकायचा असेल तर त्याची अडवणूक होता कामा नये. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच दादा भुसे यांच्याशी बोलणार असल्याचेही अर्जुन खोतकर यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT