Jadhav-Ambedkar
Jadhav-Ambedkar 
छत्रपती संभाजीनगर

काँग्रेस-राष्ट्रवादी संपली म्हणून मराठा समाजाने 'वंचित'ला सोबत घ्यावे  : हर्षवर्धन जाधव 

जगदीश पानसरे

औरंगाबाद:   " मराठा आरक्षण दिले नाही तर भविष्यात मराठा वंचित बहुजन आघाडी सोबत जाईल असे विधान मी केले होते. यावरून  माझ्यावर आता टीकेची झोड उठवली जात आहे.  परंतु माझ्या या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे," असे औरंगाबाद मतदारसंघात पावणे तीन लाख मते अपक्ष उमेदवार म्हणून घेणारया हर्षवर्धन जाधव यांनी येथे सांगितले . 

हर्षवर्धन जाधव म्हणाले,"  महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादी संपली आहे आणि अशावेळी मराठा आरक्षण जर पदरात पाडून घ्यायची असेल तर ओबीसी,दलित, मुस्लिम, आणि मराठा असे कॉम्बिनेशन नव्याने महाराष्ट्रात उदयास आले तर मोठा बदल या राज्यात घडू शकतो.  या भावनेतून मी हे विधान केले होते."

 " वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत  जी मतं घेतली त्यावरून शिवसेना-भाजपने वंचित आघाडीला पुरस्कृत करून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी संपवल्याचे दिसते.  आता लोकसभेत स्पष्ट बहुमत असताना या सरकारने जर मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही,  तर वंचित आघाडी सोबत या समाजाने जाऊन एक वेगळा पर्याय महाराष्ट्रात द्यावा ही भूमिका माझी त्या विधानामागे होती," असेही ते म्हणाले . 

" शिवसेना-भाजपचे डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आपल्याला ठोस अशी भूमिका घेणे गरजेचे आहे.अन्यथा या समाजाला हे सत्ताधारी नेहमीच गुलाम समजतील. आणि त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या काळात मराठा समाजाला एक निश्चित भूमिका आरक्षण मिळवून घेण्यासाठी घ्यावी लागेल . एका अपक्ष उमेदवाराला औरंगाबादच्या जनतेने जे भरभरून मतदान दिले त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा ऋण  व्यक्त करतो," असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT