mp imtiaz jalil news about dbholkar aurangabad
mp imtiaz jalil news about dbholkar aurangabad  
छत्रपती संभाजीनगर

दाभोलकर माफ करा, तुमच्या मारेकऱ्यांना आम्ही पकडू शकलो नाही..

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः एक भारतीय म्हणून मी तुमची माफी मागतो, दाभोलकर आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना पकडू शकलो नाही. माझी मान आज शरमेने खाली गेली आहे. तुम्ही सुशांतसिंग राजपूत नाहीत, पण तुमच्या सारख कार्य करणाऱ्या लोकांचे अस्तित्व कधीही नाहीसे होऊ शकत नाही.आजही प्रत्येकाच्या मनात तुम्ही जिवंत आहात. आपल्या आत्म्याश शांती लाभो, अशा उद्विग्न शब्दांत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणावरून देशभरा राजकीय गदारोळ सुरू आहे. राज्यातील सत्ताधारी, विरोधक यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोप सुरू असतांना तिकडे बिहारमध्ये देखील सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यावरून वातावरण चांगले तापले आहे.अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीशी देखील याचा संबंध जोडला जात आहे.

या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तिखट शब्दांत आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीच्या विरोधात लढा देण्यासाठी ज्या नरेंद्र दाभोलकर यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. अगदी आपला जीव देवून त्यांना याची किमंत मोजावी लागली, त्या दाभोलकरांच्या खुन्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. परंतु एका चित्रपट अभिनेत्याची आत्महत्या ही आत्मह्त्या आहे की खून यावरून गेली दोन महिने प्रसारमाध्यमांवर चर्चा झडत आहेत.

सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी -काॅंग्रेस आणि विरोधक भाजप यांच्याकडून तर या प्रकरणाचा पुरेपूर राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप देखील होत आहे. अशावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंग राजपूत आत्महत्येचा तपास सीबीआयने करावा, असे आदेश दिले आहेत. यावर भाष्य न करता एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे.

`एक भारतीय म्हणून मी आपली क्षमा मागतो, इतकी वर्ष होऊन गेली पण दाभोलकर आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना पकडू शकलो नाही. खरंच माझी मान शरमेने झुकली आहे. तुम्ही सुशांतसिंग राजपूत नसाल, पण तुमचे कार्य आणि केलेले काम कधीही विसरता येणार नाही. मृत्यू नंतरही तुम्ही या कार्याच्या रुपाने प्रत्येकाच्या मनात आजही जिवंत आहात. तुमच्या आत्म्याला शांती लाभो`, असे इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT