छत्रपती संभाजीनगर

वंचितला अपयश आल्यानेच आम्ही वेगळी वाट निवडली : आनंदराज आंबडेकर

सरकारनामा ब्युरो

औरंगाबादः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अपयश आल्यानंतर रिपब्लिकन सेनेने आता आपली वेगळी वाट निवडलीअशी माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी आज येथे दिली. 

आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यासाठी रिपब्लिन सेनेची नवीन राज्यकार्यकारिणी जाहीर केली. आम्ही स्वतंत्रपणे आमच्या पायावर उभे राहत आहोत. कुणासोबत जायचे का, याचा त्यावेळची परिस्थिती बघून विचार केला जाईल असेही आनंदराज म्हणाले. 

पक्षाची नवीन राज्यकार्यकारिणी गठित केल्याची माहिती देतांना औरंगाबादेत ते पत्रकारांशी बोलत होते. आंबेडकर म्हणाले, "आम्ही अन्न, वस्त्र, निवारा याकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण भाजपला मात्र सीसीए, एनआरसी आणायचे आहे. सरकारला जर कोणते रजिस्टर आणायचे असेल तर त्यांनी बेरोजगारांचे रजिस्टर आणावे, जेणेकरून देशात किती बेरोजगार आहेत याची माहिती मिळेल. 

"रामजन्मभूमीचा मुद्दा संपल्यामुळेच भाजपने सीसीए व एनआरसी पुढे आणले आहे. आमचा या कायद्याला विरोध असून भाजप सध्या धर्मावरून राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT