अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आता एमआयएम पक्षाने जिंकला आहे. शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे हे सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. सकाळ माध्यम समूहाच्या 'महाराष्ट्र दौऱ्यात' संदीप काळे यांनी त्यांची घेतलेली विशेष मुलाखत.
विधानसभा निवडणुकीचे काय नियोजन?
समजा युती झाली नाही तर शिवसेनेच्या 288 जागा लढवण्याची तयारी आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिक विमा आदी प्रश्न सोडवणे आमच्यासाठी अग्रस्थानी आहे. जनतेला हवा असलेला महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम सध्या सुरु आहे. आम्ही हिंदूत्ववादी आहोत हिंदूत्वासाठीचं काम करणार आहेत. विकास, संरक्षण आणि मदत या तीन विषयावर काम करण्याचा अधिक भर आहे.
कोणत्या गोष्टीमुळे तुमचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला?
वंचित बहूजन आघाडी अणि बंडखोरी यामुळे माझा पराभव झाला. या पराभवाला खचून न जाता आम्ही पुन्हा नविन जोमाने कामाला लागलो आहे. मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकील्ला आहे तो कायम शाबूत ठेवण्याचा प्रयत्न आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील विकास करतील का?
आमदार असताना जलील यांनी कोणताही विकास केला नाही आणि मी खासदार असताना जेवढा विकास केला तेवढा विकास जलील करु शकणार नाहीत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला मानवंदना देण्यासाठी ते उपस्थीत राहू शकले नाही हा हुतात्मांचा अपमान आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.