Delhi News: मध्य प्रदेशातील छतरपुर येथील बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांचे एक विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बाबांनी ख्रिसमसच्या एक दिवस आधी देशात राहणारे सर्व ख्रिश्चन हिंदू आहेत कारण हा देश हिंदुस्थान आहे असं वक्तव्य केले आहे.
मुस्लिम आणि ख्रिश्चन यांनची आठवी आणि नववी पिढी हिंदू आहे. ते रामलाल आणि श्यामलाल आहेत. देशात प्रत्येकजण सनातनी आहे, कोणीही वेगळं नाही, त्यामुळे आपण हिंदु राष्ट्र निर्माण करूनच करण आपल्या बहिणी-मुलींना सुरक्षित ठेवायचे असेल तर हिंदु राष्ट्र निर्माण करावे लागेल असे ते म्हणाले.
यापूर्वी देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अनेक वादग्रस्त विधान केली आहेत. देशाचा सर्वात मोठा रोग जातिभेद असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच अस्पृश्यतेच्या नावाखाली राजकीय भाकरी भाजल्या जातात, हिंदूंना भांडायला लावले जाते, हिंदूंना कमकुवत केले जाते, हिंदू भगिनींवर अत्याचार केले जातात, त्यासाठी आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, जोपर्यंत देश एक होत नाही, जोपर्यंत सर्व हिंदू एक होत नाहीत, जोपर्यंत भगवा झेंडा फडकत नाही असं देखील वक्तव्य त्यांनी केले होते.
आम्ही ख्रिश्चनांना विरोध करत नाही, मुस्लिमांना नाही, जो कोणी भारताचा विरोध करतो त्याला आम्ही विरोध करतो, आम्ही भारताचा बांगलादेश होऊ देणार नाही. याशिवाय प्रत्येक गावात हिंदू एकता मंडळे स्थापन केली जातील, गट तयार केले जातील, हिंदूंमधील जातिवाद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी हिंदू एकता समिती काम करेल, असे बागेश्वर बाबांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.