MNS Raj Thackeray Latest Marathi News, Raj Thackerays Ayodhya Visit News
MNS Raj Thackeray Latest Marathi News, Raj Thackerays Ayodhya Visit News Sarkarnama
देश

आधी माफी मगच अयोध्या; महासभेतच ठराव केल्यानं राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : माफी मागितली नाही तर आज तर सोडाच पण आपल्या आयुष्यात झारखंड, बिहार, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश इथे कुठेही त्यांना यायचं असेल तर विरोध होईल, अशा शब्दांत अयोध्येचे भाजप (BJP) खासदार ब्रिजभुषण सिंह (Brijbhushan singh) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इशारा दिला आहे. सिंह यांनी ठाकरेंच्याविरोधात महासभा बोलवून त्यात ठराव करण्यात आला आहे. सात दिवसांत माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा अल्टीमेटम सिंह यांनी दिला आहे. (Raj Thackeray Ayodhya Visit Marathi News)

राज ठाकरे हे पाच जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासाठी त्यांनी मोठी तयारीही सुरु केली आहे. मात्र राज ठाकरे यांनी यूपीतल्या जनतेची माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येच्या जमिनीवर पाय ठेवू प्रवेश करुन देणार नाही, असा इशारा सिंह यांनी दिला पुन्हा दिला आहे. त्यासाठी त्यांनी मंगळवारी महासभेचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक साधू-संत, भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महासभेमध्ये राज ठाकरे यांच्याविरोधात ठराव करण्यात आला आहे. ठाकरे यांनी जनतेची माफी मागितली नाही तर साधू-संतांची माफी मागावी, आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांनी महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर अन्याय केला आहे. ते यापुढे सहन केले जाणार नाही. त्यामुळे आधी त्यांनी माफी मागावी. त्याशिवाय त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. आता जर त्यांनी माफी मागितली नाही तर यापुढे आयुष्यात ते कधीच अयोध्यात तर सोडा पण झारखंड, बिहार, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश इथे कुठेही त्यांना यायचं असेल तर विरोध होईल, असं सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी ठाकरेंना सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातील अडचणी वाढल्या आहेत.

मागील आठवड्यात बोलताना सिंह म्हणाले होते की, जितकी तयारी त्यांची सुरु आहे तितकीच आमचीही सुरु आहे. खुप चांगलं स्वागत होईल त्यांचं. माफी मागून आले तर त्याहुन चांगलं स्वागत होईल. आता हे जन आंदोलन झाले आहे. जो त्रास राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना दिला आता त्यांनी त्यांच तोंडांने उत्तर भारतीयांची माफीही मागितली पाहिजे. जर तिकडे ट्रेन बुक होत असतील तर इकडे आम्हीही बुकींग सुरु केलं आहे. असा सूचक इशाराही ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे. राज ठाकरेंनी त्यांची चूक मान्य करावी आणि बिनधास्त अयोध्येत यावे, असंही सिंह यांनी म्हटलं आहे.

जर त्यांनी माफी मागितली नाही तर आपण काय करणार असे विचारले असता ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे अयोध्येत येऊच शकत नाही, मग ते सैन्य घेऊन आले तरीही त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही कार्यकर्ते तर लांबच राहिले. जर ते आले तर त्यांना लाखो उत्तर भारतीयांचे मृतदेह ओलांडून मंदीरात जावे लागेल, राज ठाकरे असतील मुंबईचे पण इथे दबाव टाकून तुम्ही काहीही करु शकत नाही असही सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT