Coromandel Express Accident Sarkarnama
देश

Odisha Train Accidnet: ओडिशा रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; रेल्वेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना अटक

सरकारनामा ब्यूरो

Odisha: ओडिशातील बालासोरमध्ये घडलेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये तब्बल 250 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर जवळपास एक हजार प्रवासी जखमी झाले होते. या रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या अपघाताप्रकरणी आता सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.

बालासोरमध्ये घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताप्रकरणी रेल्वेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडून अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सीनियर सेक्शन इंजिनिअर अरुण कुमार महांतो, सीनियर सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघाताप्रकरणी या तीन जणांविरुद्ध 304 आणि कलम 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओडिशातील बालासोरमध्ये 2 जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये तब्बल 250 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. यानंतर सीबीआयने अधिकाऱ्यांचे एक पथक बालासोर येथे तपासासाठी पाठवले होते.

हा अपघात नेमकी कसा झाला? याला जबाबदार कोण? हा रेल्वे अपघात कुणाच्या चुकीमुळे घडला? यासह अधिक बाबींचा तपास सीबीआयकडून करण्यात आला. ओडिशातील बालासोरमध्ये घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताचा तपास केल्यानंतर सीबीआयने मोठी कारवाई करत रेल्वेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना आज अटक केली आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT