नवी दिल्ली ः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला आज शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. लेथपोरा भागात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) बसवर दहशतवादी हल्ला होऊन त्यात ४० जवान हुतात्मा झाले होते. यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठीच्या रणनीतीत बदल केला. आता दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीमच आखली जाते. दहशतवाद्यांचे अड्डे शोधून त्यांना पकडले जात आहे किंवा चकमकीत मारले जात आहे.
‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित आदिल डरने केलेला हा हल्ला काश्मीरमधील ३० वर्षांतील सर्वांत मोठा हल्ला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाईच्या पद्धतीत बदल केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.