Land for jobs case Lalu Yadav Rabri Devi :
Land for jobs case Lalu Yadav Rabri Devi :  sarkarnama
देश

Lalu Prasad Yadav News: चौदा वर्षांपूर्वीच्या खटल्यात लालू प्रसाद यादव, राबडी देवींना दिलासा

सरकारनामा ब्युरो

Bihar News: राजदचे अध्यक्ष, माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्ली न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

लालू यांच्यासह त्यांच्या पत्नी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabari Devi), कन्या मीसा भारती यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या तिघांनी आज दिल्ली न्यायालयात हजेरी लावली होती. व्हिलचेअरवरुन ७४ वर्षीय लालू प्रसाद यादव हे न्यायालयातआले होते.

रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी जमीनच्या बदल्यात रेल्वेत काही जणांना नोकरी दिली होती, याप्रकरणी त्यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे . १५ मार्च रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडीदेवी, कन्या मीसा भारती यांच्यासह १४ अन्य जणांना १५ मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. लालू प्रसाद यादव तेव्हा रेल्वेमंत्री होते. त्यांनी आपला पदाचा गैरउपयोग करुन १२ जणांना रेल्वेत ग्रुप डीमध्ये नोकरी दिली होती.

या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक न करता आरोपपत्र दाखल केल्याचे न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणी सीबीआयने गेल्या आठवड्यात राबडी देवी यांचा जवाब नोंदवला होता. यानंतर पाच अधिकाऱ्यांच्या टीमने मीसा भारती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची देखील चौकशी केली होती. लालू प्रसाद यादव हे किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर सिंगापूरहून नुकतेच परतले आहेत.

यावेळी बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचे डॉक्टर लवकरच निर्णय घेतील की ते कोर्टरूममध्ये शारीरिकरित्या उपस्थित राहतील की नाही. डॉक्टरांनी सल्ला दिल्यास, यादव यांचे वकील सूट मागतील आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्यासाठी अर्ज दाखल करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी २९ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. १४ वर्षांपूर्वीचा हा खटला आहे. तेव्हा लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री होते.

चार दिवसापूर्वी ईडीने लालू प्रसाद यादव यांच्यावर कारवाई केली होती. चौकशी दरम्यान ६०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आढळले आहे. ईडी आणि सीबीआयच्या कारवाईमुळे सध्या बिहारचे राजकारण तापलं आहे. मोदी सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप राजदच्या नेत्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT