gautam-navlakha-teltumbde
gautam-navlakha-teltumbde 
देश

नवलखा, तेलतुंबडे यांना १६ पर्यंत अटकेपासून संरक्षण 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरेगाव भीमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकरणातील आरोपी आणि नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना दिलेल्या
अटकेपासूनच्या संरक्षणाची मुदत १६ मार्चपर्यंत वाढविली आहे. 

नवलखा आणि तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन नाकारण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली असून त्यावर १६ मार्चला सुनावणी घेणार असल्याचे न्या. अरुण मिश्रा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सांगितले. 

उपलब्ध पुरावे पाहता नवलखा आणि तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारीला त्यांचा जामीनअर्ज नाकारला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी, यासाठी चार आठवडे अटकेपासून संरक्षण दिले होते. या संरक्षणात आज वाढ करण्यात आली. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT