dirty oxygen cylinders and ventilators behind mucormycosis surge in india
dirty oxygen cylinders and ventilators behind mucormycosis surge in india 
देश

जगात भारतातच का वाढताहेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण? तज्ञांनी सांगितले कारण...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. काळी बुरशी (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. जगात भारतातच या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. याचे कारण दूषित ऑक्सिजन सिंलिंडर आणि व्हेटिंलटेर असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. 

म्युकरमायकोसिसचे रुग्ण वेगाने वाढू लागल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना हा साथीचा रोग जाहीर करण्याची सूचना केली होती. तसेच, या आजाराच्या रुग्णांचा आकडे केंद्राकडे सादर करण्यास सांगितले आहे. कोरोना संकटामुळे आधीच कोलमडून पडलेल्या आरोग्य व्यवस्थेसमोर आता म्युकरमायकोसिसचे आव्हान निर्माण झाले आहे. 

जगात इतर देशांच्या तुलनेत भारतात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. यामागे भारतीय आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा आहे. रुग्णालयांमधील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण या दोन गोष्टींचा अभाव या रोगाच्या संसर्गास कारणीभूत ठरत आहे. ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर यांचे निर्जंतुकीकरण न करता त्यांचा वापर केला जात आहे. हे या रोगाच्या पाठीमागील प्रमुख कारण असल्याचे तज्ञांचे मत आहे. 

केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आजपर्यंत म्युकरमायोसिसचे 11 हजार 717 रुग्ण आढळले आहेत. यात गुजरातमध्ये सर्वाधिक 2 हजार 859 रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2 हजार 770 रुग्ण सापडले आहे. आंध्र प्रदेशात 768 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण या तीन राज्यांत आहेत. दिल्लीतही याची रुग्णसंख्या वाढत असून, आतापर्यंत 620 रुग्ण सापडले आहेत. 

म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सरकारने आढावा घेतला आहे. हा आढावा घेतल्यानंतर राज्ये आणि केंद्रशासित अॅम्फोटेरीसिन-बीच्या 29 हजार 250 व्हाईल्स देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेच व्हाईल्सचा पुरवठा करण्यात आला आहे, असे गौडा यांनी सांगितले. 

म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण काही दिवसांत दगावतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे 'सीडीसी'चे म्हणणे आहे. भारतात या आजाराचे दरवर्षी सुमारे डझनभर रुग्ण सापडतात. सर्वसाधारणपणे शरीर अशा प्रकारच्या बुरशीला प्रतिकार करते. परंतु, प्रतिकारशक्ती कमकुवत असलेले याची शिकार होतात. अवयव प्रत्यारोपण करणारे आणि कर्करुग्णांमध्ये हा आजार आधी प्रामुख्याने आढळून येत होता. याआधी सार्सची साथ आली होती त्यावेळी या आजाराचे काही रुग्ण सापडले होते. देशात आतापर्यंत या आजारामुळे दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT