देश

आपण कपडे घालू शकतो म्हणजे देशात मंदी नाही - वीरेंद्रसिंह

सरकारनामा ब्युरो

बलिया : देशात खरोखरच आर्थिक मंदी असती तर आपण कपडेच खरेदी करू शकलो नसतो, असे सांगत भारतात आर्थिक मंदी नसल्याचा दावा भाजपचे खासदार वीरेंद्रसिंह मस्त यांनी केला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना बलियाचे खासदार विरेंद्रसिंह म्हणाले की, या कार्यक्रमाला आलेल्यांनी शर्ट आणि पॅन्ट घातली आहे. देशात आर्थिक मंदी असती तर आपल्याला शर्ट-पॅन्ट ऐवजी धोतर आणि कुर्ता घालून यावे लागले असते. भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून, ती मुख्यत्वे ग्रामीण आणि कृषी आधारीत आहे. आर्थिक मंदी असती तर शर्ट, पायजमाही खरेदी करता आला नसता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT