Shinde Government| Uddhav Thackeray|
Shinde Government| Uddhav Thackeray| Sarkarnama
देश

शिंदे-ठाकरे वादात शिवसेनेचे चिन्ह गोठवले जाणार? : ऑगस्ट महिना ठरणार निर्णायक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या बंडामुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. ४० आमदारांना सोबत घेवून शिंदे यांनी भाजपाशी (BJP) युती करत राज्यात सत्ता स्थापन केली. सुरुवातीला शिवसेना आमदारांसोबत बाहेर पडलेल्या शिंदेंना हळूहळू राज्यभरातून नगरसेवक, पदाधिकारी आणि त्यानंतर खासदारांचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने आता शिवसेना पक्षावरचं दावा केला आहे.

यामुळे नेमकी शिवसेना कोणाची असा सवाल विचारला जात आहे. याबाबतचे उत्तर आता थेट निवडणूक आयोगच देणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले असून ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत देखील देण्यात आली आहे. यानंतर निवडणूक आयोग त्यावर सुनावणी करणार आहे. या सुनावणीदरम्यान कोणताही तोडगा न निघाल्यास पुढील तोडगा निघेपर्यंत शिवसेनेचे धनुष्य-बाण हे चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर दोन्ही गटांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. याबाबत बोलताना ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेना कोणाची आहे, यासंदर्भातील पुरावे आमच्याकडे आहे. त्यामुळे ''दुध का दुध पाणी का पाणी होईल.'' तर शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई म्हणाले की, निवडणूक आयोगाने मागितलेली कागदपत्रे आणि बहुमताचे पुरावे आम्ही मुदतीत नक्कीच सादर करू. तसेच निवडणूक आयोग आणि कायद्यावर आमचा विश्वास असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT