Bhagatsingh Koshyari On Maharashtra Politics :  Sarkarnama
देश

Bhagatsingh Koshyari On Maharashtra Politics : राजकीय भूकंपावर माजी राज्यपाल कोश्यारींची प्रतिक्रिया, "जैसे ज्याचे कर्म तसै.."

सरकारनामा ब्यूरो

National News : महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय नाट्यावर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सूचक विधान केले आहे. मी महाराष्ट्राचा राज्यपाल होतो, तेव्हाच पंतप्रधान मोदींना निवेदन केलं होतं. मला पदावरून मुक्त करा. मी उत्तराखंडसाठी काम करू इच्छीत आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यपाल पदावरून दूर झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत अधून मधून प्रतक्रिया देत असतात. आता महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भूकंपावर भाष्य करताना कोश्यारी यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यावर भगतसिंग कोश्यारी म्हणाले, "'तुलसीदास यांनी म्हंटल आहे की, ज्याचे जसे कर्म असतात, तसेच फळ त्याला मिळतात. आणि हे आपल्या सर्वांना लागू होतं."(Bhagatsingh Koshyari On Maharashtra Politics)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT