PM Narendra Modi
PM Narendra Modi sarkarnama
देश

भाजप नेत्यांचा वाचाळपणा अन् आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सरकार तोंडघशी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : प्रेषित महंमद पैगंबर व मुस्लिम धर्म यांच्याबद्दल भाजप (BJP) नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. यानंतर भाजपने डॅमेज कंट्रोल म्हणून या दोन्ही नेत्यांना निलंबित केले असले तरी यामुळं मोदी सरकारची (Modi Government) जागतिक पातळीवर नाचक्की झाल्याची टीका होत आहे. भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आखाती देशांमध्ये वाढ होत आहे. कतार, इराण, कुवेतनंतर आता सौदी अरेबियानेही या प्रकरणी निषेध नोंदवला आहे.

आखाती देशांनी तेथील भारतीय राजदूतांना बोलावून प्रेषित पैगंबराबद्दलच्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. भाजप नेत्यांकडूनच अशी विधाने केली जात असल्याने मोदी सरकावर बॅकफूटवर गेले आहे. भारताचे आखाती देशांशी असलेले द्वीपक्षीय संबंध अतिशय महत्वाचे आहेत. यामुळे मोदी सरकारला हे संबंध बिघडणे धोक्याचे आहे. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू हे कतारच्या दौऱ्यावर असतानाच हा नेमका वाद उफाळून आला आहे. दरम्यान, भाजपने या दोन्ही नेत्यांची हकालपट्टी केल्याबद्दल आखाती देशांनी समाधान व्यक्त केलं आहे.

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीनकुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून मोठा गदारोळ उडाला होता. यानंतर उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होेते. उत्तर प्रदेशातील हिंसाचारात चाळीसहून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी सुमारे दीड हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही याचे पडसाद उमटले होते. अखेर भाजपने शर्मांना पक्षातून चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केलं आहे. याचवेळी भाजपने जिंदाल यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे.

नुपूर शर्मा यांच्याप्रमाणेच नवीनकुमार यांनीही ट्विटवर वादग्रस्त पोस्ट केली होती. दोन्ही नेत्यांमुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या होत्या. शर्मा आणि जिंदाल यांच्यामुळे या वादात भर पडली होती. याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गंभीरपणे दखल घेतल्याचे समजते. त्यामुळे पक्षाने दोघांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूणसिंह यांनी याबाबतचे निवेदन जाहीर केले होते. भाजपनं म्हटलं होतं की, भारताच्या हजार वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म वाढला आहे. भाजपकडून सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. कोणताही धर्म किंवा धार्मिक व्यक्तींचा अपमान निंदनीय आहे. कोणत्याही धर्माचा अपमान करणाऱ्या विचारधारेविरोधात पक्ष आहे. भाजपकडून अशा कोणत्याही विचारधारेचा प्रचार केला जात नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT