देश

देशाला हवे निर्णयक्षम नेतृत्व - अरुण जेटली

सरकारनामा ब्युरो

पुणे : मोदी सरकारने आर्थिक क्षेत्रात केलेली प्रगती पुढेही चालू राहण्यासाठी निर्णयक्षम नेतृत्वाबरोबरच धोरणात एकवाक्यता आणि स्थिर सरकारची गरज असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. अकार्यक्षम नेतृत्वाखालील कामचलाऊ आघाडी कधीही देशाचा प्रगती करू शकत नाही, असे नमूद करीत त्यांनी कॉंग्रेसला फटकारले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगातील सर्वांत गतिमान असली, तरीही आपण अजूनही सात ते साडेसात टक्के वाढीवर समाधानी नाही. आर्थिक प्रगतीचा दर आठ टक्क्यांच्या पुढे न्यायचा आहे. हा आर्थिक दर गाठायचा असेल, तर भारताचा पंतप्रधान कसा हवा ? अडथळे आणणाऱ्यांच्या आधाराने पंतप्रधान झालेली व्यक्ती हवी, की 2014 सारखे बहुमत असलेले पंतप्रधान हवेत, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT