rahul gandhi | narendra modi sarkarnama
देश

Rahul Gandhi News : पंतप्रधानांकडून जे पाहिजे ते बोलवून घेऊ शकतो, राहुल गांधींना आता 'हा' शब्द ऐकायचाय...

Pradeep Pendhare

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे चालली आहे. काँग्रेस ( Congress ) आणि भाजप ( Bjp ) या टप्प्यात एकमेकांविरोधात अधिक आक्रमक झालेत. काँग्रेस नेते राहुल गांधी या टप्प्यात अधिकच आक्रमक दिसत आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडात आता फक्त एक शब्द आणायचा बाकी आहे, तो म्हणजे देशातील बेरोजगारीचा विषय', असे म्हणून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांसह भाजपला डिवचले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आणि काँग्रेसचे राहुल गांधी ( Rahul Gandhi ) लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या सुरूवातीपासून काँग्रेसवर तुटून पडल्याचे दिसते. यानंतर हिंदुत्वाच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला चांगलेच लक्ष्य केले. काँग्रेसकडून देखील कधी नव्हे, पंतप्रधान मोदींच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील त्यांच्या भाषणाची धार वाढवली आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ले चढवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात पायी 'भारत जोडो न्याय यात्रा' काढली. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यात्रेमुळे राहुल गांधींचा कॉन्फिडंट वाढल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसले. लोकसभा निवडणुकाला समोरे जाताना काँग्रेसने जाहीरनामा दिला. राहुल गांधींनी हा जाहीरनामा देशातील लोकांकडून तयार करून घेतला. हा जाहीरमाना त्यांचा तोंडपाठ आहे. त्यातील प्रत्येक योजनांची माहिती प्रत्येक सभेत देताना दिसतात. त्यामुळे अलीकडच्या काळात राहुल गांधींचा कॉन्फिडंट वाढल्याचे दिसतो. यातूनच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी समोरासमोर चर्चा करण्याचे आमंत्रण स्वीकारले. परंतु, भाजपने त्यात राजकीय खेळी केली. हे लक्षात येताच राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे चर्चेचे आमंत्रण टाळत आहे, हे सांगत आहे. यातून भाजपचीच कोंडी झाल्याचे दिसते.

पंतप्रधानांच्या तोंडातून आपल्याला जे पाहिजे, ते बोलावून घेऊ शकतो, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. ते एका सभेत बोलत होते. "तुम्हाला जे नरेंद्र मोदी यांच्या तोंडातून बोलवून घ्यायचे आहे, ते मला सांगा. ते मी त्यांच्याकडून बरोबर बोलवून घेऊ शकतो. महालक्ष्मी योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बोलवून घेतले आहे. या योजनेद्वारे गरिब महिल्यांच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये दिले जातील. दर महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट.. खटाखट... महिलेच्या बँक खात्यात जमा होतात. मी भाषणात खटाखट बोललो, तर आता नरेंद्र मोदी त्यांच्या प्रत्येक भाषणात खटाखट... खटाखट.., असे पटापट... पटापट.., बोलत सुटलेत. त्यामुळे पंतप्रधानांकडून जे काही बोलवून घ्यायचे आहे, ते मला सांगा. मी बोलवून घेतो", असे राहुल गांधी यांनी म्हटले.

राहुल गांधी यांना त्यांच्या ट्विटवर पोस्ट शेअर केली आहे. आता नरेंद्र मोदी यांच्याकडून एक शब्द आणखी ऐकायचा आहे. तो म्हणजे देशातील वाढलेल्या बेरोजगारीचा. देशातील बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी नरेंद्र मोदींची रिटायरमेंट जरूरी आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT