Nitish Kumar, PM Narendra Modi, Chandrababu Naidu Sarkarnama
देश

Nitish Kumar-Chandrababu Naidu : दोन ‘बाबूं’पैकी एकाने साथ सोडली तरी मोदी सरकार ‘सेफ’; असा आहे नंबर गेम...

Rajanand More

NDA Vs India Alliance : लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला बिहार आणि आंध्र प्रदेशातील दोन बाबूंनी वाचवले आणि पुढेही तेच किंगमेकर असतील, अशा चर्चा झडत आहेत. त्यातच इंडिया आघाडीतील काही नेत्यांकडून या दोन बाबूंच्याच खांद्यावर बंदूक ठेवून एनडीएला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हे दोन बाबू म्हणजे बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नीतिश कुमार आणि आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू. नितीश कुमार बिहारमध्ये नितीशबाबू म्हणून प्रसिध्द आहेत. हे दोघे एनडीएतून बाहेर पडल्यास इंडिया आघाडीची सत्ता स्थापन करण्यास बळ मिळेल, असे दावा काही नेत्यांकडून केला जात आहे.

आकड्यांचे गणित पाहिल्यास या दोघांपैकी एक बाबू नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेऊ शकतात. एनडीएला एकूण 292 जागा मिळाल्या असून 272 पेक्षा 20 जागा जास्त आहेत. सर्वाधिक 240 खासदार भाजपकडे आहेत. तर चंद्राबाबूंच्या 16 आणि नितीश कुमारांच्या 12 जागा अशा एकूण 28 जागा आहेत.

नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले तरी एनडीएचे संख्याबळ 280 वर स्थिरावेल. तर एकचे चंद्राबाबू बाहेर पडल्यास हे सख्याबळ 276 पर्यंत खाली येईल. बहुमताच्या आकड्यापेक्षा चार खासदार अधिक असतील. त्याचप्रमाणे सध्या एनडीए तसेच इंडिया आघाडीमध्ये नसलेले अपक्ष व इतर छोट्या पक्षांच्या खासदारांची संख्या 17 आहे.     

एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही अपक्ष आणि छोट्या पक्षांचे अनेक खासदार मोदी सरकारला पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे सरकार आणखी भक्कम होऊ शकते. दोन बाबू सोबत राहिल्यास आणि इतरांचेही पाठबळ मिळाल्यास सरकारला पाठिंबा असलेल्या खासदारांची संख्या 300 चाही आकडा पार करू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT