Mallikarjun Kharge News
Mallikarjun Kharge News 
देश

Mallikarjun Kharge उद्या स्वीकारणार पक्षाध्यक्षपदाचा पदभार

सरकारनामा ब्युरो

Mallikarjun Kharge : नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे विजयी झाले आहेत. 24 वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत खर्गे यांनी शशी थरुर यांचा पराभव केला. उद्या (26 ऑक्टोबरला) मल्लिकार्जुन खर्गे पक्षाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. नवी दिल्लीतील 24 अकबर रस्त्यावरील काँग्रेस (Congress) मुख्यालयात हेडक्वॉर्टरमध्ये सकाळी साडेदहा वाजता खर्गे अधिकृतरित्या पदभार स्वीकारतील. या कार्यक्रमात महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जाणार आहे.

24 वर्षांनंतर झालेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली निवडणुकीसाठी देशभरातील सर्व राज्य काँग्रेस समित्यांकडे मतपेट्या पाठवण्यात आल्या होत्या. त्यांना नवी दिल्लीतील 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात (AICC) आणण्यात आले. या ठिकाणी सर्व मतांची मोजणी झाली. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर आमनेसामने होते.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन यांचा वरचष्मा होता. खर्गे यांना गांधी घराण्याचा पाठिंबा आहे. यासह त्यांच्या नामांकनावेळी पक्षातील सर्व बडे नेते मंडळीसुद्धा उपस्थित होते. अशा स्थितीत निवडणुकीत खर्गे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असतानाच आता ते अधिकृतरीत्या काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. Shashi Tharoor यांच्याकडून Mallikarjun Kharge यांची कॉंग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अभिनंदनपर पत्र जारी करत कौतुक करण्यात आले आहे. त्यांनी या पत्रामध्ये कॉंग्रेस पक्षाचं पुनरूज्जीवन सुरु झालं असल्याची भावना व्यक्त केली आहे.

खर्गे यांनी शशी थरूर यांचा जवळपास 7 हजार मतांनी पराभव केला. अधिकृत माहितीनुसार, खर्गे यांना 7 हजार 897 मते मिळाली. त्याचवेळी शशी थरूर यांना केवळ 1 हजार 72 मते मिळवता आली. 416 मते नाकारण्यात आली. मात्र, मतमोजणी सुरू असतानाच राहुल गांधी यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार हे सांगितले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान आंध्रमधील पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले होते– आता माझी भूमिकाही खर्गेजीच ठरवतील.

गांधी घराण्याकडेच 42 वर्षे पक्षाचे नेतृत्व

खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष होणारे दुसरे दलित नेते आहेत. बाबू जगजीवन राम हे काँग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले दलित नेते होते. स्वातंत्र्यानंतर 75 पैकी 42 वर्षे पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडेच राहिले. त्याच वेळी 33 वर्षे पक्षाध्यक्षपदाचा सूत्रे गांधी घराण्याव्यतिरिक्त इतर नेत्यांकडे राहिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT