Manoj Naravane’s Statement to Pakistan Abhi Picture Baaki Hai : पहलगाम दहशतवादी हल्ल्यास भारताकडून अखेर जबरदस्त प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे भारताने मध्यरात्री एअर स्ट्राइक करून उध्वस्त केले, या कारवाईला भारताने ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं आहे.
या हल्ल्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे, तर जगभरातून भारताच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. मात्र भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी अभी पिक्चर बाकी है असं सांगून पाकिस्तानचं टेन्शन अधिकच वाढवलेलं आहे.
भारतीय सैन्याने लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांचे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अड्डे उध्वस्त केले आहेत. भारताने एकूण नऊ ठिकाणं लक्ष्य केली होती आणि ती पूर्णपणे नष्ट देखील केली आहेत.
विशेष म्हणजे भारताने आपल्या कारवाईत सर्वसामान्यांना यापासून नुकसान होणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेत केवळ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरच निशाणा साधला, त्यामुळे जगभरातून भारताचं कौतुक केलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.