Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
देश

Sharad Pawar News : 'लोक माझे सांगाती' मध्ये पवारांचे ठाकरेंना टोल्यांवर टोले !

सरकारनामा ब्यूरो

NCP President Sharad Pawar slams Uddhav Thackeray : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अडीच वर्षांनंतर आघाडी सरकार कोसळलं. "संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला," अशा शब्दात शरद पवारांनी आपल्या 'लोक माझे सांगाती'या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीत म्हटलं आहे.

या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले.'लोक माझे सांगाती'मध्ये पवारांनी अनेक विषयांवर परखडपणे भाष्य केलं आहे. ठाकरे गट, शिवसेना, दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांचे पवारांनी कान टोचले आहे.

उद्धव ठाकरेंबाबत पवार काय म्हणाले..

आघाडी'च्या सत्तेला विराम

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल, याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं. संघर्ष न करता उद्धव यांनी राजीनामा दिल्यामुळे 'महाविकास आघाडी'च्या सत्तेला विराम मिळाला. राजकारणातल्या अतर्क्यतेचा आणखी एक अनुभव गाठीशी जमा झाला.

राजकीय चातुर्य हवं..

उद्या काय होऊ शकेल, याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी आणि त्यानुसार आजच काय पावलं उचलायला पाहिजेत, हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य हवं. या सर्व बाबतीत आम्हाला कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्यानं हे घडत असलं, तरी ते टाळता आलं असतं.

ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये, मंत्री मैदानात

कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात वास्तविक महाराष्ट्र हॉटस्पॉट असूनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्या वेळी केलेली कामगिरी फारच स्पृहणीय होती. उद्धव ठाकरेही प्रशासनाच्या संपर्कात होते, परंतु ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. राजेश आणि राष्ट्रवादीचे सारे मंत्री प्रत्यक्ष मैदानात सक्रिय होते.

त्याचं कारण शारीरिक अस्वास्थ्य हेच असावं..

राजकारणात सत्ता राखण्यासाठी वेगाने हालचाली कराव्या लागतात. परंतु 'महाविकास आघाडी' सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या प्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्प्यात माघार घेतली. त्याचंही कारण शारीरिक अस्वास्थ्य हेच असावं.

  • बाळासाहेबांसमवेतची संवादातील सहजता उद्धव यांच्याशी बोलताना नव्हती. मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्रालयात फक्त दोनदा जाणे आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते'

  • ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेतच वादळ माजेल याचा आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडले,

  • संघर्ष न करता उद्धव यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला'

  • महाविकास आघाडी आकाराला येताना शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववाद मारक ठरेल, अशी भीती काहींना होती.

  • शिवसेनेच्या बाबतीत माझे मत ऐकाल तर, हा पक्ष वेळोवेळी कितीही जोरकसपणे भूमिका मांडो, त्यांचा वैचारिक पाया तितका भक्कम नाही.

  • शिवसेनेच्या पूर्वेतिहासावर नजर टाकली तर राजकारणासाठी लागणारी लवचिकता त्यांनी वारंवार दाखविली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT