NITI Aayog On Mamata Banerjee Sarkarnama
देश

NITI Aayog On Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या आरोपांवर आता थेट 'NITI' आयोगाचीही प्रतिक्रिया आली समोर!

Mayur Ratnaparkhe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी दावा केली की, नीती आयोगाच्या ज्या बैठकीत सहभागी होण्यासाठी त्या गेल्या होत्या. तिथे त्यांना बोलूच दिलं गेलं नाही आणि माईक बंद केला गेला. यावरून आता राजकीय वातावरण तापलेलं आहे. जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असून, विविध प्रतिक्रियाही समोर येत आहे.

भाजपने ममता बॅनर्जींच्या(Mamata Banerjee) आरोपांवर पलटवार केला आहे. तर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनीही ममता बॅनर्जी खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय पीआयबीच्या फॅक्ट चेक रिपोर्टरमध्येही ममता बॅनर्जींचा दावा फोल ठरला आहे. या सगळ्यानंतर आता नीती आयोगाकडूनही ममता बॅनर्जींच्या दाव्यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बैठकीस उपस्थित होत्या. मुख्यमंत्री जेवणा अगोदर बोलायचं म्हणाल्या होत्या, ही त्यांच्याकडूनच स्पष्टपणे मागणी केली गेली होती. खरंतर सर्वसाधारणपणे अल्फाबेटिकल क्रमानुसार बोलण्यासाठी वेळ दिला जात असतो. म्हणून बोलण्याची सुरुवात आंध्र प्रदेशपासून होते आणि क्रमाने पुढे जाते. आम्ही प्रत्यक्षात समायोजन केले आणि संरक्षण मंत्र्यांनी त्यांना गुजराच्या बरोबर आधी बोलावले.

याशिवाय त्यांनी सांगितले की, 'प्रत्येक मुख्यमंत्र्यास बोलण्यास सात मिनिटं दिली जातात आणि स्क्रीनवर केवळ एकच घड्याळ असतं, जे तुम्हाला उर्वरीत वेळ दर्शवत असतं. ते सात, सहा, पाच, चार आणि तीन असं जात असतं. त्याच्या शेवटी वेळ संपल्यावर शून्य दिसते आणि मग पुढे काहीच नाही. याशिवाय काहीच घडत नाही. यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, हे बघा मला आणखी बोलायचं होतं.

परंतु मी बोलणार नाही. आता आणखी काही बोलणार नाही, बस एवढंच. याशिवाय आणखी काही नव्हतं, आम्ही सर्वांनी ऐकलं. त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि आम्ही सन्मानपूर्वक ते ऐकलं व त्यांची नोंद घेतली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निघून गेल्यानंतरही बंगालचे मुख्य सचिव बैठकीत कायम होते.'

कोणते मुख्यमंत्री बैठकीत उपस्थित होते? -

बीवीआर सुब्रमण्यम यांनी म्हटले की, दहा राज्य बैठकीस गैरहजर होते. ज्यामध्ये केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगण, बिहार, दिल्ली, पंजाब, हिमाचल, झारखंड आणि पुद्दुचेरी. यांचा समावेश होता. बिहारमध्ये विधानसभा सत्र उशीरापर्यंत सुरू होते म्हणून ते अनुपस्थित होते. तर 26 राज्य बैठकीस उपस्थित होते, यापैकी सर्व मुख्यमंत्र्यांना सात मिनिटांचा वेळ दिला गेला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT