देश

जनता दल युनायटेड भाजपसोबत फक्त बिहारमध्येच, नितिशकुमारांचा दुसरा दणका

सरकारनामा ब्युरो

पाटणा : बिहारच्या बाहेर जनता दल युनायटेड (जेडीयू) हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून यापुढे राहणार नाही. जम्मू-काश्‍मीर, झारखंड, हरियाणा आणि दिल्लीत होऊ घातलेल्या आगामी निवडणुका देखील हा पक्ष स्वबळावरच लढणार आहे. पाटणा येथे काल झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. चार राज्यापैकी झारखंडच्या निवडणुकीत जेडीयुची ही भूमिका भाजपला अडचणीची ठरू शकते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात जेडीयूच्या खासदारांना मंत्रीपद घेऊ देण्यास नितीश यांनी नकार दिला होता. पक्षाच्या कालच्या बैठकीत नितीश कुमार काहीतरी मोठा निर्णय घेतील ही अपेक्षा होतीच. त्यानुसार त्यांनी एनडीएला धक्का देत स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे. खरेतर त्यांनी शुक्रवारी सांगितले होते की, भाजपा बरोबरचे आमचे संबंध पुर्वीप्रमाणेच चांगले राहणार आहेत. एनडीए आघाडीतील त्यांचा सहभाग कायम राहील. या बैठकीस मुख्यमंत्री नितीश कुमार, पक्षाचे वरिष्ठ नेते प्रशांत किशोर, नारायण सिंह व केसी त्यागी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल कशी राहील यावर चर्चा करण्यात आली. 

आता पक्षाची भूमिका बदलली असून राज्यसभेत हा पक्ष भाजपला मदत करणार का हा खरा प्रश्‍न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT