देश

आंध्रात कोणत्याही परिस्थितीत "एनआरसी' लागू करणार नाही : जगन मोहन रेड्डी 

सरकारनामा ब्युरो

कडाप्पा : कॅब आणि एनआरसीच्या मुद्यावर देशात तणावाचे वातावरण असताना अनेक राज्यांनी हे दोन्ही कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे.

जे मोदी-शहा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची आरती ओवाळतात त्यांनी भाजपला झटका दिला असून आंध्रात कोणत्याही परिस्थिती एनआरसी लागू करणार नाही असा इशारा दिला आहे. 

भाजपशासित प्रदेश वगळता इतर राज्यात एनआरसी आणि कॅब लागू करणार नसल्याची भूमिका काही राज्यानी घेतली आहे. त्यामध्ये पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. आता आंध्रप्रदेशने बॅनर्जी यांच्या सुरात सुर मिसळला आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी कडाप्पा जिल्ह्यात एका सभेत बोलताना या वादग्रस्त विषयाला हात घातलाच. राज्यातील जनतेचे या मुद्याकडे लक्ष लागले होते. 

मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले, की आपले सरकार एनआरसीच्या विरोधात असून राज्यात कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू करणार नाही त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल. त्यामुळे आंध्रप्रदेशात हा कायदा काही येणार नाही असे दिसते. रेड्डी यांनी याबाबत तसे ट्‌विट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT