Bhaiyyu Maharaj Sarkarnama
देश

भय्यू महाराजांचे दोन IAS अधिकाऱ्यांसह 12 तरूणींशी संबंध; षडयंत्राचा एका फोनने पर्दाफाश

सरकारनामा ब्युरो

इंदोर : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्या प्रकरणात इंदोर न्यायालयाने शुक्रवारी मुख्य सेवादार विनायक दुधाळे (Vinayak Dudhale), चालक, शरद देशमुख (Sharad Deshmukh) आणि शिष्या पलक पुराणिक (Palak Puranik) यांना दोषी धरत प्रत्येकी सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. आत्महत्येमागच्या षडयंत्राचा पर्दाफाश एका फोन कॉलने झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. महाराजांचे 12 तरूणींशी संबंध होते. त्यापैकी दोन तरूणी आयएएस (IAS) अधिकारी होत्या.

भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका तिघांवर ठेवण्यात आला. आरोपींकडून त्यांना पैशांसाठी धमकावले जात होते. तिघांना जानेवारी 2019 रोजी अटक करण्यात आले होते. सुरूवातीला या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी घरगुती वाद असं कारण देत फाईल बंद करण्याची तयारी केली होती. याबाबत दैनिक भास्करने वृत्त दिले आहे.

पण दोन महिन्यांनी महाराजांचे जवळचे वकील निवेश बडजात्या यांना आलेल्या एका फोन कॉलने पुन्हा पोलिसांना सतर्क केलं. बडजात्या यांना फोनवरून पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यांना धमकी देणारा महाराजांचा चालक कैलास पाटील होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर विनायक, शरद आणि पलक या तिघांचे नावे समोर आली. पलकला अनेकदा महाराजांच्या गाडीने घरून आश्रमात आणि तिथून पुन्ही घेऊन जात असल्याचेही कैलास चौकशीत मान्य केले.

गाडीमध्ये पलक विनायक आणि शरदशी फोनवरून बोलत असे. याबाबतही कैलासने माहिती दिली होती. हाच धागा पकडून पोलिसांनी तिघांकडे चौकशी केली. त्यातून महाराजांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे षडयंत्र समोर आले. या तपासात महाराजांचे बारा तरूणींचे संबंध असल्याचेही पुढे आले. यामध्ये दोन आयएएस महिला अधिकाऱ्यांचा संबंध होता. महाराज गाडीमुळे अनेक मुलींशी बोलत होते. असे कैलासने पोलिसांना सांगितले होते.

पलकसह सोनिया, शालिनी, मल्लिका अशा 12 तरूणींबाबत कैलासनेच माहिती दिली. दुसऱ्या राज्यातील दोन महिला आयएएस अधिकाऱ्यांचाही त्यामध्ये समावश होता. विनायकला याबाबत माहिती होते. त्याच्याजवळ तरूणींचे फोन येत होते, असे कैलासने पोलिसांना सांगितले होते. मला अचानक सहा महिन्यांसाठी पुण्यात पाठवण्यात आले. आश्रमाच्या कामकाजापासून दूर करण्यात आले. महाराजांचा अत्यंत विश्वास असलेल्या मनमीतच्या घरासमोरच पलक राहत होती. मनमीतने विनायक आणि शेखर या दोघांशी पलकची भेट घडवून दिली. त्यानंतर तिला आश्रमात आणले, असा जबाब कैलासने डिसेंबर 2018 मध्ये दिला होता, असे दैनिक भास्करच्या वृत्तात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT